कधी कधी आपण एखाद्याला विचारतो,
"काय, इतका पण विश्वास नाही का माझ्यावर?"
तेव्हा ह्यावर अगदी सहज उत्तर काही वेळा दिलं जातं...
"विश्वास तर पाणिपतच्या लढाईत मेला"
खरच ना! आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वैयक्तिक पातळीवर ही पानीपतची लडाई सुरूच असते..आणि ह्यामधे बळी जातो तो विश्वासाचा.
आणि एखाद्याच्या विश्वासाचा बळी जाणं म्हणजेच त्या व्यक्तीचा विश्वासघात होणं. आणि हा विश्वासघात होणं म्हणजेच आपण ज्याला म्हणतो एखाद्याच्या पाठीत खंजीर खुपसणं!
आणि ह्या अश्या परिस्थितीतून आपल्यातील प्रत्येक जण गेलेला असतो. कोणीही ह्याला अपवाद नाही..
आपण एखाद्या व्यक्तिवर खुप विशवास ठेवतो, अगदी किती तरी वर्षांच्या ओळखीतून एक बांधीलकि निर्माण झालेली असते आणि त्यातूनच पुढे मग हा विश्वास develop झालेला असतो.. आणि मग एक दिवस असा एक क्षण येतो की ती व्यक्ति मग काही स्वार्थामुळे म्हणा, किंवा कुठल्याही कारणासाठी म्हणा, आपल्या त्या विश्वासाला तडा द्यायला जरा ही मागे पुढे बघत नाही. आणि मग जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजते तेव्हा मग एका क्षणासाठी काळजात असे चर्रर होऊन जाते आणि मग आपले मन असंख्य प्रश्नांच्या विळख्यात जखडले जाते... "का? कशासाठी? आपण काय ह्याचे वाईट चिंतले होते किंवा काय ह्याचे घोडे मारले होते? का असा विश्वासघात केला?" असे एक ना अनेक प्रश्न लहरी मनात तरंगायला लागतात. पण ह्याचे उत्तर काही सापडत नाही आणि मग नाईलाजाने गप्प बसावे लागते.. ह्यातूनच मग हळूहळू असे होत जाते की आपले मन कोणावरही विश्वास ठेवायला तयार नसते. आणि मग अविश्वासाचे जाळे पसरत जाते आणि आपण सर्वच ह्या जाळ्यात मग अडकून जातो.
कधी कधी खरेच असे वाटते की जर प्रत्येकाने असे ठरवले की.. मी माझ्या अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तिशी तरी कायम प्रामाणिक राहील, किमान प्रत्येक जण एका तरी व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याची काळजी घेईल तर कदाचित ह्या सध्या मजबूत झालेल्या अविश्वासाच्या जाळयातून बाहेर पडायला सोपे होईल, नाही का?
जर ही गोष्ट आपल्या स्वतःपासूनच सुरु करायचा प्रयास केला तर?
"काय, इतका पण विश्वास नाही का माझ्यावर?"
तेव्हा ह्यावर अगदी सहज उत्तर काही वेळा दिलं जातं...
"विश्वास तर पाणिपतच्या लढाईत मेला"
खरच ना! आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वैयक्तिक पातळीवर ही पानीपतची लडाई सुरूच असते..आणि ह्यामधे बळी जातो तो विश्वासाचा.
आणि एखाद्याच्या विश्वासाचा बळी जाणं म्हणजेच त्या व्यक्तीचा विश्वासघात होणं. आणि हा विश्वासघात होणं म्हणजेच आपण ज्याला म्हणतो एखाद्याच्या पाठीत खंजीर खुपसणं!
आणि ह्या अश्या परिस्थितीतून आपल्यातील प्रत्येक जण गेलेला असतो. कोणीही ह्याला अपवाद नाही..
आपण एखाद्या व्यक्तिवर खुप विशवास ठेवतो, अगदी किती तरी वर्षांच्या ओळखीतून एक बांधीलकि निर्माण झालेली असते आणि त्यातूनच पुढे मग हा विश्वास develop झालेला असतो.. आणि मग एक दिवस असा एक क्षण येतो की ती व्यक्ति मग काही स्वार्थामुळे म्हणा, किंवा कुठल्याही कारणासाठी म्हणा, आपल्या त्या विश्वासाला तडा द्यायला जरा ही मागे पुढे बघत नाही. आणि मग जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजते तेव्हा मग एका क्षणासाठी काळजात असे चर्रर होऊन जाते आणि मग आपले मन असंख्य प्रश्नांच्या विळख्यात जखडले जाते... "का? कशासाठी? आपण काय ह्याचे वाईट चिंतले होते किंवा काय ह्याचे घोडे मारले होते? का असा विश्वासघात केला?" असे एक ना अनेक प्रश्न लहरी मनात तरंगायला लागतात. पण ह्याचे उत्तर काही सापडत नाही आणि मग नाईलाजाने गप्प बसावे लागते.. ह्यातूनच मग हळूहळू असे होत जाते की आपले मन कोणावरही विश्वास ठेवायला तयार नसते. आणि मग अविश्वासाचे जाळे पसरत जाते आणि आपण सर्वच ह्या जाळ्यात मग अडकून जातो.
कधी कधी खरेच असे वाटते की जर प्रत्येकाने असे ठरवले की.. मी माझ्या अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तिशी तरी कायम प्रामाणिक राहील, किमान प्रत्येक जण एका तरी व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याची काळजी घेईल तर कदाचित ह्या सध्या मजबूत झालेल्या अविश्वासाच्या जाळयातून बाहेर पडायला सोपे होईल, नाही का?
जर ही गोष्ट आपल्या स्वतःपासूनच सुरु करायचा प्रयास केला तर?