असेच सायंकाळी एका
मन रमले होते एका विश्वातच वेगळ्या
बाहेरही ढग जमुनी आले होते सारे
पसरली होती चोहिकडे अगदी निरव अशी शांतता
कसला ही आवाज नाही
नाही कुठलीही हालचाल
झाडांनाही अलगदच
स्पर्श होत होता वाऱ्याचा
बाहेर होती निव्वळ शांतता
मनात मात्र होता कल्लोळ विचारांचा
बाहेरील शांतता पाहून
मनातला गोंधळ क्षणभर थांबला
वाटले जरा अनुभवावा
कधीतरी एकांत हा
स्वतःशीच बोलावे अन
स्वतःशीच हसावे
अगदी मनमुरादपणे,
स्वतःशीच भांडावे
वाटले कधी रडावेसे तर
भरपूर रडून ही घ्यावे
बांध सारे तोडून,
सर्व भावनांना बेछूटपणे वाहू द्यावे
नको कोणते संभाषण
नको कुठल्या भेटी गाठी
सोडुनी भ्रांत साऱ्या
स्वतःच स्वतःमधे रंगून जावे
नाही कोणी रोखायला,
नाही कोणी टोकायला
पाहिजे तसे पाहिजे तेव्हा,
मोकळे आपण बागडायला
सर्वांमधे राहून ही
'एकटे' तर बरेच राहतात
पण एकांतात राहुनही
मेळाव्याचा भास घेणारे तसे कमीच असतात..
- केतकी कुलकर्णी
3 comments:
एकांतपणा घेणारे खरच कमी असतात.
केतकी खूप सुंदर हृदयस्पर्शी कविता... बांध सारे तोडून, सर्व भावनांना बेछूटपणे वाहू द्यावे --खरेच ही एकांताची किमया अगदी प्रत्येकाला अनुभवावीशी वाटते कायम .
नको कोणते संभाषण
नको कुठल्या भेटी गाठी
सोडुनी भ्रांत साऱ्या
स्वतःच स्वतःमधे रंगून जावे .... असा हा एकांत खरोखरीच आपलीच आपल्याला स्वत:ची एक नव्याने ओळख करून देतो...
अप्रतिम शब्दांनी रेखाटले आहे...
Awesome Poem... Hatsoff to you KetakiVeera..
After listening to this poem i recollected these lines which i heard long back
Ek baki ekaki...
Ek ant ekaant..
Ek adke ekat..ek ekta jagat..
Ek Khidki ek vara...
Ek chandra ek tara...
Ek najar ek vaat..
Ek ekta...ektaach....
Post a Comment